देवभक्तिहून श्रेष्ठ असलेल्या गुरुभक्तीची महती सांगणारा पुणे येथील सनातनचा भक्तिमय गुरुपौर्णिमा महोत्सव !

संतांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यात ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! या महोत्सवांचे संक्षिप्त वृत्त प्रस्तुत करीत आहोत.

राज्यातील ७५ सहस्र गोविंदांना शासनाकडून विम्याचे संरक्षण !

दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचतांना अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू आल्यास, २ अवयव किंवा १ डोळा निकामी झाल्यास, किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून १० लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे.

सध्या प्रत्येकाला आपला धर्म किंवा देव सर्वोच्च आहे, हे सांगायचे असते ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘‘सध्या लोक त्यांच्या धर्मांविषयी पूर्वीपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहेत. प्रत्येकाला आपला धर्म किंवा देव कसा सर्वोच्च आहे, हेच सांगायचे असते.’’ व्हॉट्सॲप गटामध्ये धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून दोन..

येत्या १५ दिवसांत ४५८ धर्मादाय रुग्णालयातील गरिबांसाठीच्या खाटांची उपलब्धता ऑनलाईन कळणार !

राज्यातील काही धर्मादाय रुग्णालयांमध्ये ‘बोगस’ रुग्ण दाखवून सरकारची फसवणूक चालू आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी, तसेच धर्मादाय रुग्णालयात गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी असलेल्या राखीव खाटांचा लाभ त्यांना व्हावा…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात खोपोली, जांभूळपाडा, पेण आणि अलीबाग अशा ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

२४ जुलैला रात्री भिडे पूल आणि टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती आणि संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.

सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथे एकूण ६ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांचा लाभ ७२५ हून अधिक साधक आणि जिज्ञासू यांनी घेतला.

पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस रहित !

त्यामुळे मुंबई आणि पुणे येथील प्रवाशांची गैरसोय झाली.

पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटला !

मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. मागील २४ घंट्यांत पवना धरण परिसरात ३७४ मि.मी. पाऊस पडला आहे.

‘लवासा सिटी’त दरड कोसळून २ बंगले मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले !

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली; पण बचाव पथकाला घटनास्थळी पोचण्यास विलंब झाला. मुळशी तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे बचाव पथक अडकून पडल्याची माहिती आहे.