(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !

सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे !

सनातन धर्म शाश्‍वत कर्तव्‍यांचा समूह आहे. यात देश, राजा, माता, पिता आणि गुरु यांच्‍याप्रती कर्तव्‍य, तसेच गरीबांच्‍या सेवेसमवेत अन्‍य कर्तव्‍ये यांचाही समावेश आहे. यामुळे सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे आहे, असे मत मद्रास उच्‍च न्‍यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्‍यक्‍त केले.

मथुरेतील बांकेबिहारी मंदिराची मुसलमानांनी लाटलेली भूमी परत घेण्याचा उच्च न्यायालयाचा प्रशासनाला आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन ही भूमी स्वतःहून कह्यात का घेत नाही ?

संयुक्त अरब अमिरातने भारताच्या मानचित्रात (नकाशात) पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्याने पाकचा थयथयाट !

संयुक्त अरब अमिरातकडे उत्तर मागण्याची पाकची पात्रता तरी आहे का ? जे सत्य आहे, ते कुणी मान्य करत असेल, तर त्यात चूक काय ?

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या शिक्षेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास लाहोर उच्च न्यायालयाचा नकार  

लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ बंद !

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ १७ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला. हा क्लब भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होता. या ठिकाणी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह क्रांतीकारकही राहिले होते.

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

(म्हणे) ‘नेपाळकडे आधीच वीज अल्प असतांना ती भारताला का विकत आहे ?’ – चीन

भारताची धोरणे नेहमीच नेपाळच्या हिताची राहिली आहेत. नेपाळला भारतापासून तोडण्याचा डाव नेपाळमधील चीनचा राजदूत करत आहे. हे षड्यंत्र लक्षात घ्या !

(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

भिवंडी येथील लाचखोर पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

लाचखोरी मुळापासून नष्ट होण्यासाठी लाचखोरांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !