मुंब्रा येथे जिलेटीनच्‍या कांड्या आणि डिटोनेटर सापडले !

मुंब्रा येथील रेतीबंदर दिवा खाडी परिसरात ठाणे पोलिसांना स्‍फोटकांचा साठा सापडला आहे. यात १६ जिलेटिनच्‍या कांड्या आणि १७ डिटोनेटर आढळून आले असून १२ सप्‍टेंबरला पोलिसांनी कारवाई करून हा साठा जप्‍त केला आहे.

मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘सनातन धर्म डेंग्‍यू, मलेरिया यांच्‍यासारखा नष्‍ट होणार का ?’

नाशिक येथील महापालिकेकडून गणेशोत्‍सव मंडळांना ७५० रुपयांचे शुल्‍क माफ !

सार्वजनिक गणेशोत्‍सवात महानगरपालिकेच्‍या जागेवर मंडप, व्‍यासपीठ आणि कमानी यांसाठी शहरातील १ सहस्र २०० गणेशोत्‍सव मंडळांना ७५० रुपयांची शुल्‍क माफी देण्‍याचा प्रस्‍ताव येथील महापालिकेच्‍या महासभेत संमत झाला असून ..

मुंबईमध्‍ये १ लाख गणसेवक करणार गणेशोत्‍सवाची सुरक्षा !

मुंबई पोलीस आणि ‘बृहन्‍मुंबई सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समिती’ यांच्‍यात झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.

विद्यार्थ्‍यांनो, केवळ परीक्षार्थी न होता खरे विद्यार्थी बनण्‍याचा प्रयत्न करा ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

मुझफ्‍फरपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन !

वर्ष २००६ मध्ये सचिन तेंडुलकर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता !

क्रिक्रेट जिहाद करणार्‍या पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचे नाही, असा निर्णय भारत कधी घेणार ? भारताने पाकशी खेळण्याला विरोध करणार्‍या राष्ट्रप्रेमींवर टीका करणारे आता गप्प का ?

चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – लडाखचे उप राज्यपाल

आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.

काशी, अयोध्या आणि उज्जैन नंतर मथुरेचा कायापालट होणार !

हिंदूंच्या तीर्थस्थळांना धार्मिक पर्यटन केंद्र न बनवता ती हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्र होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! भारताला विश्‍वगुरु व्हायचे असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

सनातन धर्माविरुद्ध बोलणार्‍यांची जीभ आणि डोळे बाहेर काढू !

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आपल्यावर १ सहस्र वर्षे सतत आक्रमणे झाली; पण आपले पूर्वज सक्षम होते, त्यांनी स्वत:च्या बळावर भारताच्या संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण केले.

‘इंडिया’ आघाडीची स्थापना सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीच झाली !

द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !