साधकाला नकारात्मक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सद़्गुरु सत्यवान कदम यांनी केलेले साहाय्य !
एका सत्संगात माझ्याकडून झालेल्या चुकांची मला जाणीव करून दिली. त्यानंतर माझ्या मनात नकारात्मक विचार येऊन मला निराशा आली होती. व्यक्तीला निराशा येते, त्या वेळी तिचे मन आणि बुद्धी तिला ‘मीच कसे योग्य आहे ?’, या विचारांभोवती फिरवत रहाते.