त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील पिंडीवरील बर्फ हा ३ पुजार्‍यांनी केलेला बनाव !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांत याहून वेगळे काय घडणार ? सरकारच्या कह्यातून मंदिरे मुक्त केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

पणजी येथे तिरंग्याचा अवमान

एका व्यक्तीला सकाळी चालतांना तिरंगा रस्त्यावर पडलेला आणि तो एका मृत उंदराला गुंडाळण्यासाठी वापरल्याचे आढळून आले होते. यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी तिरंग्याचा अवमान झाल्याविषयी चलचित्र प्रसारित केले.

देहली दंगलीच्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

वर्ष २०२० मध्ये राजधानी देहलीत धर्मांधांनी दंगल घडवून आणली होती. या दंगलीतील धर्मांधांना शस्त्रे पुरवण्याचे काम उत्तरप्रदेशातील मेरठ येथील एका टोळीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दंगलीत सहभागी झालेल्या धर्मांधांना शस्त्रे पुरवण्यासाठी व्हॉट्सॲप गट बवनण्यात आला होता.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !

आंगणेवाडी जत्रोत्सवात पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, असे ४०० जण, तसेच मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी सेवारत होते.

भारतावर निर्बंध लादण्याचा विचार नाही ! – कैरेन डॉनफ्राइड, साहाय्यक परराष्ट्रमंत्री, अमेरिका

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असला, तरी अमेरिका त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादणार नाही, असे वक्तव्य अमेरिकेचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री कैरेन डॉनफ्राइड यांनी केले आहे. ‘नैतिकतेच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत.

भूकंपानंतर जनतेला आमच्याकडून म्हणावे तसे साहाय्य झाले नाही ! – राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची स्वीकृती

मृतांची संख्या १५ सहस्रांहून अधिक

दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या काणकोण येथे थांबा घेणार ! – रमेश तवडकर, सभापती

दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या लवकरच काणकोण येथे थांबा घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी दिले आहे.

चीनने १२ देशांत हेरगिरी केली !

चीनच्या वाढत्या कुरापती या जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरल्या आहेत. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे आवश्यक आहे !