वास्को येथे साई मंदिराची कमान पाडल्याच्या प्रकरणी संशयित अल्पसंख्य व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यास पोलिसांची दिरंगाई !

हिंदूंच्या मागण्यांकडे डोळेझाक करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशा पोलिसांवर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत.

चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्‍या रेल्वेमार्गाचे काम !

तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे.

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा संरक्षक पत्रा कोसळून दुचाकीस्वार घायाळ 

मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला.

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याचे मिरज शासकीय रुग्णालयातून पलायन

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे.

दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली.

पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

‘फास्टॅग’ला १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना ‘फास्टॅग’ लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते.

कणकवली बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक

बाजारपेठेतील झेंडाचौक येथे ४ जानेवारीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ‘जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस’ अन् ‘रामचंद्र उचले किराणा आणि आयुर्वेदिक दुकान’ ही दोन दुकाने जळून खाक झाली.

सांगली-कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण : सायंकाळी कोल्हापुरात पाऊस

४ जानेवारीला सांगली-कोल्हापुरात ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी कोल्हापुरात जोरात पाऊस आला. ५ जानेवारीलाही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.