महामार्ग ठेकेदारावर गुन्हा नोंद होण्यासाठी संतप्त नागरिकांचे रस्ताबंद आंदोलन
कणकवली – येथे मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला. ‘ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात येथे वरचेवर होत असतात’, असा आरोप करत नागरिकांनी ‘ठेकेदारावर गुन्हा नोंद करावा’, या मागणीसाठी रस्ताबंद आंदोलन केले. या वेळी ४५ मिनिटे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (नागरिकांना आंदोलन करून अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कृती का करत नाहीत ? – संपादक) अखेर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकारामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत होत्या. (महामार्गाचे काम कणकवली शहरात चालू झाल्यापासून अनेकविध समस्या तेथे निर्माण झाल्या आणि होत आहेत. यापूर्वी शहरात बांधण्यात येत असलेल्या एका पुलाच्या भिंतीचा काही भाग कोसळून अपघात झाला होता. लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी आंदोलने करूनही ठेकेदार अन् प्रशासन योग्य त्या उपाययोजना न करता जनतेच्या जीवाशी खेळत असेल, तर याचा अर्थ काय घ्यायचा ? – संपादक)
त्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले. या वेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर