कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते.

मुंबईत लोकल रेल्वेने अधिवक्त्यांना प्रवासाची अनुमती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

लोकलमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्यशासनाने निर्बंध ठेवले आहेत, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने लोकल रेल्वेगाड्यांमधून अधिवक्त्यांना प्रवास करण्याची अनुमती नाकारली आहे.

‘दक्षिण मुंबई कॅटरिंग  असोशिएशन’कडून ‘२ घास पोटासाठी’ उपक्रमाद्वारे अन्नवाटप !

कोरोनाच्या कालावधीत हातावर पोट असणारे नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी ‘दक्षिण मुंबई कॅटरिंग असोशिएशन’ या संस्थेच्या वतीने काळाचौकी आणि शिवडी येथील कामगार विभागात ‘दोन घास पोटासाठी’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

९० ते ९५ टक्के मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली !

मोठ्यांपासून लहानांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मोठ्यांनी लहानांना जपावे, असा उपदेशही त्यांनी दिला.

कठडा कोसळण्याआधी प्रशासनाला कळत कसे नाही ?

‘चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८.५.२०२१ या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे.’

खांडवा येथे १७ वर्षे जुन्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्याचा अयशस्वी प्रयत्न !

येथे राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला असता ती चालूच झाली नाही. तिला धक्काही मारण्यात आला, तरीही ती जागची हलली नाही.

रुग्णाच्या मृत्यूनंतर आधुनिक वैद्यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोरोनाबाधितावर उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना मारहाण केली. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावरील घटना दुर्दैवी ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

‘तौक्ते’ वादळामुळे अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावर झालेली घटना दुर्दैवी आहे. या वादळामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेविषयी केंद्र सरकारने चौकशीचे निर्देश दिले आहेत.

नागपूरसह देशात ४ ठिकाणी मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी होणार !  – आधुनिक वैद्य समीर पालतेवार

‘नागपूरसह पाटणा, देहली आणि भाग्यनगर (हैद्राबाद) या देशातील ४ ठिकाणी लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी देशातील २ ते १८ वयोगटांतील ५२५ मुलांची निवड करण्यात येणार आहे.

वैशाख मासातील (२३.५.२०२१ ते २९.५.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.