बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !

‘मराठी’चा जागर अपेक्षित !

संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्‍यिक हे केंद्रस्‍थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्‍यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्‍य संमेलने, असे त्‍याला स्‍वरूप प्राप्‍त होत आहे. आता सामान्‍य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्‍त होईपर्यंत पाठपुरावा करावा !

‘आत्‍मनिर्भर’वर भर !

जगातील पाचवी अर्थव्‍यवस्‍था असतांना जनता स्‍वतःच्‍या किमान गरजा भागवण्‍यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्‍प थेट सर्वसामान्‍यांचे दैनंदिन आयुष्‍य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्‍यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्‍हणता येईल !

तिजोरीची छिद्रे बंद करा !

योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्‍पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?

खलिस्तानवाद्यांचा बीमोड !

इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !

दरिद्री पाक आणि भारताची भूमिका !

भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !

हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!

आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्‍यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?

पुरस्‍काराचा मान !

यावर्षी चांगल्‍या व्‍यक्‍तींना पुरस्‍कार दिल्‍याचा आनंद जरी असला, तरी राष्‍ट्रघातकी आणि राष्‍ट्र किंवा समाज यांप्रती काहीही भरीव कामगिरी न करणारे लोक यांचा गौरव होणे, हे सामान्‍य जनतेच्‍या पचनी न पडणारे ! त्यातल्या त्यात अध्‍यात्‍मक्षेत्रातील व्‍यक्‍तींना ‘पद्म पुरस्‍कार’ मिळणे, ही येत्‍या काळातील देशातील आध्‍यात्मिक वातावरणाची नांदी !

‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ? तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !