१ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात हरिद्वार कुंभमेळा होणार ! – उत्तराखंड सरकारचा निर्णय

नवीन रेल्वे किंवा बस यांना अनुमती नाही !

लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांकडून त्यागपत्र

सर्वपक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत, अशांची निष्पक्षपणे चौकशी होईल का ?

कर्नाटकच्या भाजप सरकारच्या कृषीमंत्र्यांनी घरातच सपत्नीक घेतली कोरोनाची लस !

टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन ! सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !  

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’कडून विनाअट क्षमायाचना !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! अ‍ॅमेझॉन प्राईम आणि अन्य ओटीटी मंचांकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या वेब सिरीज प्रसारित झाल्या असल्याने केवळ क्षमायाचना मागितल्याने त्यांना सोडून देण्यात येऊ नये. अशांना शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न झाले पाहिजेत, तेव्हाच त्यांच्यावर वचक बसेल !

सरकारपेक्षा वेगळे मत व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नाही ! – सर्वोच्च न्यायालय

फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्‍याला ५० सहस्र रुपयांचा दंड !

सीरिया सुरक्षित झाल्याचे सांगत डेन्मार्कमधून शरणार्थींची त्यांच्या देशात रवानगी !

शरण आलेल्या निर्वासितांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची घोषणा करणारा डेन्मार्क हा पहिला युरोपीय देश आहे.

सातारा नगर परिषदेचे अंदाजपत्रक फेटाळण्याची मागणी

सातारा नगरपालिकेने सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ आणि महाराष्ट्र लेखासंहिता नियम यांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे अंदाजपत्रक फेटाळण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे केली आहे.

(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.

कोरोना प्रतिबंधक लस बनवणार्‍या भारतीय आस्थापनांवरही चीनचे सायबर आक्रमण ! – सिंगापूरच्या सायबर गुप्तचर आस्थापनाचा दावा

या दाव्यात तथ्य असेल, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने नमते घेतल्याचे दाखवले असले, तरी त्याने वेगळ्या प्रकारे भारतावर आघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, हेच खरे !

चीनने देप्सांगपासून २४ किमी अंतरावरील चौकीजवळ केले नवीन बांधकाम !

उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड : अशा विश्‍वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !