
नवी देहली – अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील ५ शहरांत दळणवळण बंदी लावण्याच्या दिलेल्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. लक्ष्मणपुरी, वाराणसी, कानपूर, प्रयागराज आणि गोरखपूर या शहरांत २६ एप्रिल २०२१ पर्यंत दळणवळण बंदी लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने १९ एप्रिल या दिवशी राज्य सरकारला दिल्यानंतर सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेशात असेही म्हटले की, आमच्याकडे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी उच्च न्यायालयानेच करावी.
उत्तरप्रदेश सरकारने दळणवळण बंदीला विरोध करतांना न्यायालयात म्हटले की, बंदीमुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे संरक्षण करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशांवर कार्यवाही होऊ शकत नाही. कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणी लोक आपणहूनच बंद पाळत आहेत.
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार