पुणे- कोरोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे; मात्र चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले २ पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलीसच पळतात, ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळाले पाहिजे. त्या दोघांवर कारवाई केली; परंतु अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते. घडलेली घटना दुर्दैवी आहे. (पोलीस चोरांना घाबरतात म्हणजे त्यांना प्रशिक्षण योग्य प्रकारे दिले जात नाही का ? कि पोलिसांचे मनोधैर्य खालावले आहे ? – संपादक) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पुण्यात औंधमधील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये २८ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास सोसायटीमधील चोरांना पाहून गस्तीवर असणार्या पोलिसांनी पळ काढला होता.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > चोर आले म्हणून पोलीसच पळतात ही घटना दुर्दैवी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
चोर आले म्हणून पोलीसच पळतात ही घटना दुर्दैवी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
नूतन लेख
- Burhanpur Train Derail Attempt : साबीर नावाच्या रेल्वे कर्मचार्याला अटक !
- थोडक्यात महत्त्वाचे : मेळघाटात खासगी बस दरीत कोसळली !…..महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा धर्मांध अटकेत….
- अत्याचार करून मुलीचे अश्लील छायाचित्र पाठवणार्या मुलावर गुन्हा नोंद
- लाचखोर ग्रामविस्तार अधिकार्यासह कंत्राटी सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले !
- पुणे येथे अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी ४५ वर्षीय धर्मांधाला अटक
- ४ दुकानांवरील धाडीत २९२ किलो गोमांस जप्त !