आज पत्रकार दिनानिमित्त वाशी येथे परिसंवादाचे आयोजन

दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारीला परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर

राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर पडली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे.

ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या उद्रेकामुळे भारत दौर्‍यावर येऊ शकत नाही !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे नियोजित भारत दौरा रहित केला आहे.

सरपंचपदाच्या निवडीसाठी होत असलेल्या लिलावाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल घेणार

सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !

कोरोनाचे लसीकरण ऐच्छिक असून लसीमुळे कोणताही धोका नाही ! – डॉ. शेखर साळकर

‘कोवेक्सीन’ या कोरोनाच्या लसीमुळे कुणालाही धोका उद्भवणार नाही; मात्र लसीविषयी कुणालाही शंका वाटत असल्यास त्याने संपूर्ण लसीकरण प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी लसीकरण प्रक्रियेतून बाहेर पडणे योग्य ठरेल.

गोव्यात अल्प कालावधीत सर्वांनाच लस देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात अल्प कालावधीत १०० टक्के लोकांना लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. राज्याचे क्षेत्रफळ लहान असल्याने, याचा लाभ लसीकरणाच्या वेळी होणार आहे.

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’सह ‘रिमोट कंट्रोल’वर चालणारी उपकरणे वापरण्यावर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’, ‘पॅराग्लायडर्स’ यांसह रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या ‘मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियएल मिसाईल’ आदी यंत्रणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे

मंदिरांच्या भूमीवरील अवैध नियंत्रण हटवून ती मुक्त करावी !

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

२ आठवड्यांत मंदिर पुन्हा उभारा आणि तोडफोड करणार्‍यांकडून पैसे वसूल करा !

भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !