दळणवळण बंदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार्‍यांत असंतोष

व्यापार्‍यांनी ‘या दळणवळण बंदीला आमचा विरोध असून पोलिसांना गुन्हे नोंद करायचे असतील, तर त्यांनी ते करावेत; मात्र आम्ही आमची दुकाने उघडणार’, असा पवित्रा घेतला आहे.

ससून रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांची संपावर जाण्याची चेतावणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असणे गंभीर आहे.

नवी मुंबई आणि पनवेल येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद; व्यापार्‍यांचे आंदोलन !

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १ मास कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पनवेल, नवी मुंबई परिसरांतील दुकाने ६ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आली होती.

महावितरणवर ३९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज, तर ७१ सहस्र कोटी रुपयांची वसुली शेष

सद्यःस्थितीत महावितरणवर ३९ सहस्र कोटी रुपये इतके कर्ज आहे. प्रतिमासाला कर्जापोटी २ सहस्र कोटी रुपये इतका निधी महावितरणला द्यावा लागत आहे. सद्यःस्थितीत महावितरणची ७१ सहस्र कोटी रुपयांची वसुली शेष आहे.

प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. मी स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करीन. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.

न्यायमूर्ती एन्.व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश !

भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती वेंकट रमन्ना हे विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला संमती दिली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने झालेल्या रक्तदान शिबिरात १०२ धारकर्‍यांचे रक्तदान !

शिबिरात रक्तदान केलेल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट

स्वाध्याय अभ्यासमालेत सोलापूर जिल्हा प्रथम, साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी

स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ?

अकोला येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आचार्‍याच्या कानशिलात लगावली !

बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील खानावळीला भेट दिली. या वेळी कडू यांना खानावळीतील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचे लक्षात आले आणि त्यातूनच त्यांनी स्वयंपाक्याच्या कानाखाली लगावली…..