श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन

मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.

ठाणे येथील प्रख्यात मामलेदार मिसळ उपाहारगृहाचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर यांचे निधन

येथील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर (वय ८४ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. लक्ष्मण मुर्डेश्‍वर हे सनातन संस्थेचे हितचिंतक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते.

पुणे जिल्ह्यात सर्वांत अल्प, तर कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी मतदान

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर या दिवशी मतदान झाले. यात पदवीधरसाठी ५७.९६ टक्के आणि शिक्षक मतदारसंघासाठी ७३.०४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार पुणे येथे असूनही नेहमीप्रमाणे तेथील सुशिक्षितांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी मात्र निरुत्साह दिसून आला.

मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर केल्या जातील ! – दीपक वायंगणकर, उपजिल्हाधिकारी

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी समाधान देण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत केला जाईल – डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर

मुसलमान तरुणाचे हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी धर्मांतर

मुसलमान तरुणाने केलेले धर्मांतर किती दिवस टिकणार ? कि तो नंतर हिंदु तरुणीचेच धर्मांतर करणार ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

जुने गोवेचा काही भाग ‘ग्रेटर पणजी’त समाविष्ट करण्याचा प्रस्ताव रहित ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’च्या अंतर्गत जुने गोवे पंचायत क्षेत्रातील आणखी काही भाग ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव नगरनियोजन विभागाने रहित केला आहे.

बांदा तपासणी नाक्यावर पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

कोकण रेल्वेमार्गावर ४ डिसेंबरपासून २ अतीजलद गाड्या धावणार

गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.