कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवास १७ डिसेंबरपासून प्रारंभ

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ७ वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वन्यजिवांचा प्रामुख्याने वाघांचा ‘कॉरिडॉर’ असलेल्या  कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ सहस्र ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा १९१ पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ५ डिसेंबर या दिवशी राज्यातील १९१ पंचायतींशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला. ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’, या योजनेचाच हा एक भाग होता.

जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडी ही जनतेच्या विश्‍वासाच्या बळावर स्थापन झाली आहे. कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही आणि घाबरणार नाही. जनतेच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उत्तरप्रदेशात आता ८ वीपर्यंतचे विद्यार्थी आठवड्यातून एकदा दप्तराविना जाणार !

तरुण पिढीला खर्‍या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी तिच्यावर साधनेचा संस्कार करून ती करवून घेणे आवश्यक आहे.

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रविष्ट केलेले खटले मागे घेणार ! – शासनाचा निर्णय

राज्यातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या वेळी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने २ डिसेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाकडे अर्ज

कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबियांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने ४ डिसेंबर या दिवशी विशेष ‘पीएम्एलए’ न्यायालयाकडे केली आहे. त्यांची संपत्तीही कह्यात घेण्याची अनुमती अंमलबजावणी संचालनालयाने मागितली आहे.

कोल्हापूर येथील जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या बंदीवानाची कारागृहात हत्या

कारागृहात हत्या होत असतील, तर कारागृह प्रशासन नावाची काही गोष्ट आहे कि नाही, असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ?

शिवमोग्गा येथे धर्मांधांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही ! – कर्नाटकचे मंत्री ईश्‍वरप्पा यांची चेतावणी

शिवमोग्गा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केल्याचे प्रकरण

कर्नाटकने नियम धाब्यावर बसवून म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवले !

म्हादई पाणीतंट्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट असतांनाही कर्नाटक शासनाने म्हादई नदीचे पाणी वळवणे चालूच ठेवल्याचा दावा ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.