गोव्यात दिवसभरात ९४ कोरोनाबाधित
गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाच्या १ सहस्र २९७ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी ९४ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १२४ रुग्ण बरे झाले.
गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाच्या १ सहस्र २९७ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी ९४ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १२४ रुग्ण बरे झाले.
रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
योग्य पद्धतीने मतदानही करू न शकणार्या मतदारांना शिक्षित म्हणायचे का ?
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदार संघात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
पंढरपूरकरांना ५ डिसेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आगाऊ’ नोंदणी न करता थेट घेता येणार आहे. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रहिवासी असल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेले लेखक वरवरा राव यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर १४ डिसेंबरला या दिवशी सविस्तर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून चालू आहेत. अशाच एका उद्योजकाला खुनाची धमकी देत त्याच्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी उकळणार्या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.
कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आम्ही नियमितपणे यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू असे कळवले होते.
मंदिरात दर्शनास येणार्या भाविकांनी वस्त्रसंहिता पाळावी, असे आवाहन शिर्डी देवस्थानद्वारे करण्यात आले आहे. हे अतिशय योग्य असून ब्राह्मण महासंघ महिला आघाडीचा या निर्णयास पूर्ण पाठिंबा आहे. देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी, असे स्पष्ट मत ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने व्यक्त केले आहे.