उज्जैन येथे नाथ संप्रदायाच्या पंच पीर समाधीला हिरवा रंग देऊन ती बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना साधूंनी हाकलवून लावले !

मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यात येत होते. तर आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे !

संतकवी दासगणु महाराज शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष असतांनाचे पावित्र्य मंदिर सरकारीकरणानंतर लयाला जाणे

दासगणु महाराजांसारखा संत पुरुष अध्यक्ष असल्याने देवस्थानचे पावित्र्य उच्च दर्जाचे होते आणि कारभार अत्यंत स्वच्छ होता. सरकार नियुक्त विश्‍वस्त आले, पुढारी त्यात घुसले आणि त्या संस्थानचे पावित्र्य लयाला गेले अन् सर्व स्थिती बिघडली.

ओडिशातील प्राचीन दक्षेश्‍वर मंदिरातील २२ मौल्यवान मूर्तींची चोरी

पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरात मूर्तींची चोरी होते, यावरून पुरातत्व विभागाचा कारभार लक्षात येतो ? असला विभाग हवा कशाला ?

पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमण

श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा !

तमिळनाडूतील प्राचीन मंदिरात तोडफोड करून चोरी

गेल्या ७३ वर्षांतील सर्वच शासनकर्ते मंदिरांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले असल्याने मंदिरांच्या सुरक्षेसाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

हिंदु धर्म अणि मंदिरे यांच्या रक्षणार्थ विदर्भस्तरीय मंदिर विश्‍वस्तांची ऑनलाईन बैठक

या बैठकीत नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. प्रत्येक मंदिरामध्ये सात्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, धर्मशिक्षण फलक लावावेत, सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यांवर सर्वांची सहमती झाली.

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी सापडलेले अर्धा किलो सोने सरकारजमा !

हिंदूंच्या मंदिरांच्या सोन्यावर सरकारचा काय अधिकार ? मशीद किंवा चर्चच्या संपत्तीवर सरकार कधी असा अधिकार गाजवते का ? अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी आणि हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बांगलादेशमध्ये मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड आणि दागिन्यांची लूट !

पाबना (बांगलादेश)च्या शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्‍या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्या आणि दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे.

मलप्पूरम् (केरळ) येथील मंदिरात हिजाब परिधान केलेल्या महिलेकडून बूट घालून प्रवेश !

हिंदूंच्या देशात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस होतेच कसे ? इस्लामी देशात अन्य धर्मीय असे करण्याचे धाडस करू शकतील का ? साम्यवाद्यांच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य अशा प्रकारे भंग केले जात असेल, तर आश्‍चर्य काय ?