आंध्र नव्हे, ख्रिस्तीप्रदेश !

भाजपने जगनमोहन सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारनेही या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करू शकतो. अन्यथा उद्या आंध्रप्रदेश ‘ख्रिस्तीप्रदेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला, तर आश्‍चर्य नव्हे !

या घटना रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथील विघ्नेश्‍वर मंदिरामध्ये भगवान श्री सुब्रह्मण्येश्‍वर स्वामी यांची मूर्ती अज्ञातांकडून फोडण्यात आली. राज्यात गेल्या १९ मासांमध्ये १२० मंदिरांवर आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत.

पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !

पाकमध्ये शेकडो धर्मांधांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून जाळले !  

हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !

आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !

पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत !

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम यांना स्थानिक ख्रिस्त्यांचा विरोध !

दुसर्‍या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्‍या ख्रिस्त्यांना पोलिसांनी समज का दिली नाही ?

चेन्नई येथे मंदिरासाठीची आरक्षित भूमी महापालिकेने सभागृह बांधण्यासाठी कह्यात घेतल्याच्या विरोधात भारत हिंदू मुन्नानीचे आंदोलन

हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

काश्मीरमध्ये एका पसार पोलीस अधिकार्‍यासह ८ आतंकवाद्यांना अटक

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, उलट तेथील काही जिहादी वृत्तीचे पोलीस आतंकवाद्यांना जाऊन मिळाले आहेत. आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केल्याविना हा आतंकवाद थांबणार नाही !