महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या अनेक मोठ्या मंदिरांतील घोटाळे उघड करण्याचे कार्य हिंदु विधिज्ञ परिषदेने केले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणार्या ३ सहस्र २०० हून अधिक देवस्थानांतील विविध घोटाळे समोर आणले आणि त्याविषयी न्यायालयीन लढा दिला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील पवित्र माणिकर्णिका कुंडावर शौचालय बांधले, देवीला रासायनिक लेपन करण्यात आले, नैमित्तिक पूजा-पाठ यांत पालट केले गेले, देवीचे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यात आले. याविरोधात जनआंदोलन उभे केले. याचे फलित म्हणून आज मणिकर्णिका कुंडावरील शौचालय हटवून त्याचे पुन्हा उत्खनन करण्यात येत आहे. सरकारच्या कचाट्यातून मंदिरांची सुटका करून ती भाविकांच्या कह्यात देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्यच आहे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्य ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधिज्ञ परिषद
धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्य ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधिज्ञ परिषद
नूतन लेख
- श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !
- संपादकीय : सरकारी आस्थापनांचा पांढरा हत्ती !
- विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !
- हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशादर्शक ‘सनातन प्रभात’ !
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
- वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदु विधीज्ञ परिषद