संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्यांचा गदारोळ !
संजय राऊत सत्ताधार्यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.
संजय राऊत सत्ताधार्यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.
नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी करावे, असा आदेश औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल.’
या वेळी उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेचे भूसंपादन प्रलंबित असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रथमच हे गीत वाजवण्यात आले. ‘वन्दे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.
अधिवेशनाच्या दुसर्या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्यास त्यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्या सूत्राखाली…
विरोधी आमदारांमध्ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारची विधाने केली, त्यातून हे राज्य सरकार खरोखरच ‘महाराष्ट्रविरोधी’ वाटू लागले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.
खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची सुपारी देण्याचा विषय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलीस चौकीत मारहाण आणि त्यात त्याचा मृत्यू, तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व ५६ आमदारांना पक्षादेश काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही हा पक्षादेश लागू असेल. त्याचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे.
राज्याचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प ९ मार्च या दिवशी वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत सादर करणार आहेत. अंदाजे १५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालवले जाऊ शकते.