आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातय !

आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातय !

गोव्यात सध्या भूमी घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. एकीकडे हा गदारोळ चालू असतांनाच पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या संचालिका ब्लोसम मेडेरा यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांना हटवणे आणि मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यात काही शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगणे, याला योगायोग म्हणायचा का ?

फुकाचे बोल !

फुकाचे बोल !

अशा प्रकारे विधाने करून हिंदूंना डिवचण्याचे काम मौलाना रझा यांनी केले आहे. भारतासह विदेशातही ‘मोदी मोदी’ नावाचा गजर होत असतांना ‘असा नेता मुसलमानांनाही मिळावा’, असे कदाचित् रझा यांना वाटत असेल, तर त्यांनीच सभेला आलेल्या सर्व मुसलमानांना घेऊन हिंदु व्हावे !

शिखांचे मौन !

शिखांचे मौन !

काबूलच्या गुरुद्वारावर नूपुर शर्मा यांच्या विधानावरून आक्रमण झाले आहे, हे हिंदूंनी विसरू नये ! याचा एकाही इस्लामी देशाने निषेध किंवा विधान केलेले नाही. इस्लामिक स्टेटचा विरोध इस्लामी देश तसेच भारतातील मुसलमानही कधी करत नाहीत. त्यांनीही गुरुद्वारावरील आक्रमणाचा विरोध केलेला नाही, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे !

शांततेची परिभाषा काय ?

शांततेची परिभाषा काय ?

भारतात अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे !

अन्नधान्याची नासाडी टाळा !

अन्नधान्याची नासाडी टाळा !

मुंबईत ६९ लाख किलो खाद्यपदार्थ प्रतिदिन कचऱ्यात फेकले जातात.नासाडी अशीच होत राहिली, तर वर्ष २०५० पर्यंत सद्यःस्थितीपेक्षा तिप्पट लोकांवर उपासमारीची वेळ ओढावेल !

‘अग्नीपथ’च्या विरोधातील षड्यंत्र !

‘अग्नीपथ’च्या विरोधातील षड्यंत्र !

राष्ट्रीय लोकदलाच्या वतीने संपूर्ण जुलै मासात उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल शहरांत अग्नीपथच्या विरोधात आंदोलनासाठी बैठका घेण्यात येणार आहेत. त्या होण्यापूर्वी सरकारने या देशद्रोही शक्तींचा बंदोबस्त केला पाहिजे !

अल्पवयिनांमधील हिंसकता !

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

‘अग्नी’मय पथ !

‘अग्नी’मय पथ !

हिंसाचार केलेल्या युवकांवर गुन्हे नोंदवून त्यांना ‘अग्नीवीर’ बनण्यापासून रोखायला हवे. जे युवक स्वार्थासाठी देशाच्या मालमत्तेची हानी करू पहातात, ते ‘अग्नीवीर’ बनून कोणते देशहित साधणार आहेत ? त्यासाठी त्यांची पात्रता आहे का ? ‘अग्नीवीर’ हे देशाचे वीरपुत्र असले पाहिजेत, जे नीच स्वार्थासाठी नाही, तर देशाची एकता आणि अखंडता यांसाठी झगडतील !

गांधीवाद्यांची हिंसा !

गांधीवाद्यांची हिंसा !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे ! जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !