फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे ‘अखिल भारतीय संत समिती’कडून गोवंश रक्षणासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन !

पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा ! गोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

भोसरी (पुणे) येथे कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’चे आयोजन !

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी जनमित्र सेवा संघ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गोपरिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे..

इंदापूर (पुणे) येथील ७ अनधिकृत पशूवधगृहे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी पाडली !

या वेळी गोरक्षक हृषीकेश कामथे यांनी सांगितले की, ही पशूवधगृहे पाडली असली, तरी गोहत्या पुढे थांबणार नाहीत; कारण कसायांनी नवीन जागा बघून ठेवली आहे, तसेच गोरक्षकांचेही गोमातेला वाचवण्याचे प्रयत्न सातत्याने चालू रहातील.

लम्पी विषाणूच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या २५ गायींसाठी उघडण्यात आले द्वारकाधीश मंदिर !

कच्छ येथील गोशाळेतील २५ गायींना २ मासांपूर्वी लम्पी या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्या वेळी सौराष्ट्रात लम्पी विषाणूमुळे शेकडो गायींचा बळी गेला होता. त्यामुळे या गोशाळेचे मालक महादेव देसाई यांनी ‘गायी बर्‍या झाल्या, तर गायींसह दर्शनाला येईन’, असा नवस भगवान द्वारकाधीशाकडे (भगवान श्रीकृष्णाकडे) बोलला होता.

कर्नाटक सरकारची गायींना दत्तक घेण्यासाठी ‘पुण्यकोटी दत्तू योजना’ !

योजनेसाठी सरकारने लोकप्रतिनिधींकडूनही एक दिवसाचे वेतन घेतले पाहिजे किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीला किमान १ गाय दत्तक घेण्यास सांगितले पाहिजे, असेच गोप्रेमींना वाटते !

गायरान भूमीवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान भूमीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी काढून टाकायची आहेत. सांगली जिल्ह्यातील अतिक्रमणे १० दिवसांच्या आत काढून घ्यावीत; अन्यथा ती काढून टाकण्यात येतील. व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

राज्यात गोसंवर्धन आयोग स्थापन करा !

गाय ही भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे प्रतीक आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक समृद्धी करण्यासाठी, तसेच ग्रामीण अर्थक्रांतीसाठी देशी गाय संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे. तरी या संदर्भात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात त्वरित गोसंवर्धन आयोग स्थापन करावा.

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक जप्त !

२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटे पकडला. ट्रकचालक आणि अन्य ४ आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेऊन ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला.

राज्यात ‘गोसेवा आयोग’ लागू करा !

गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांत ज्याप्रमाणे ‘गोसेवा आयोग’ लागू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ‘गोसेवा आयोग’ लागू करावा, अशी मागणी जळगाव येथील गोशाळा महासंघाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

गोशाळेच्या माध्यमातून २०० गोवंशियांचा सांभाळ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चालवणार्‍या जाणार्‍या गोशाळेच्या माध्यमातून २०० लहान आणि मोठ्या अशा गोवंशियांचा सांभाळ केला जात आहे. गायींपासून मिळणारे दूध हे प्रतिदिन नैमित्तिक पूजेसाठी वापरण्यात येते, तर उर्वरित दूध हे रुग्णाईत, तसेच लहान बालकांचे पालक यांना विक्री केली जाते.