४ मासांनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या झाली ७०० हून अधिक !

सध्या देशात ४ सहस्र ६२३ कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख ३० सहस्र ७९० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील भारतीय दूतावासाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानवाद्यांचे आंदोलन !

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतियांचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन देऊनही अशा घटना घडत असतील, तर आता भारत सरकारने ऑस्ट्रेलियावर दबाव आणून तेथील हिंदूंचे रक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे !

एरिक गार्सेट्टी भारतातील अमेरिकेचे राजदूत नियुक्त !

गेल्या २ वर्षांपासून हे पद रिक्त होते. इतके दिवस हे पद रिक्त रहाण्याची ही पहिलीच वेळ होती. एरिक गार्सेटी पूर्वी लॉस एंजेलिसचे शहराचे महापौर होते.

राज्यातील १४ गडांवरील अतिक्रमणे शासन हटवणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

यापूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गडांवरील अतिक्रमणे का हटवली नाहीत ? अनेक गडांवर अवैध कबरी आणि दर्गे आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले का ? याविषयी चौकशी व्हावी.

गोवा : मेरशी येथील ‘जंक्शन’वर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ‘सिग्नल’ यंत्रणेचे उद्घाटन

नवीन यंत्रणेमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्य होईल. या यंत्रणेत वाहतुकीचे नियंत्रण करण्यासह वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांची कॅमेर्‍याद्वारे नोंद होईल.

सिंधुदुर्ग : प्रशासनाच्या आश्वासनानंतर वानोशी येथील पाण्यासाठीचे उपोषण स्थगित !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणे, ही प्रशासनाची निष्क्रीयताच !

काणकोण (गोवा) समुद्रकिनार्‍यावर रात्री संगीतामुळे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवावे ! – नागरिकांची पोलिसांत तक्रार

नागरिकांना कर्कश संगीताचा त्रास होतो; तर मग पोलीस आणि प्रशासन यांना ते ऐकूही येत नाही का ? पोलीस आणि प्रशासन यांचे हात कुणी बांधलेले आहेत कि त्यांचे हात यात गुंतले आहेत ?

वनांना लागलेल्या आगीच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयात अहवाल सादर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

एफ्.एस्.आय्. (फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया) कडून उपग्रहाद्वारे केलेल्या वनाच्या सर्वेक्षणामध्ये १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण भारतात जवळपास ४२ सहस्र ७९९ ठिकाणी वनाला आग लागल्याचे आढळून आले आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा हा देशद्रोहच !

‘भारताला जगात किंमत आहे ती केवळ भारतातील अध्यात्मशास्त्रामुळे. त्यालाच ‘खोटे’ म्हणणे, हा बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा देशद्रोहच नव्हे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले