बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’

पंतप्रधान येणार असलेल्या सभामंडपाचे भूमीपूजन पार पडले !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी देहू येथे येणार आहेत. ज्या मंडपातून पंतप्रधान वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत, त्या सभा मंडपाचे भूमीपूजन २ जून या दिवशी झाले.

… तर पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल ! – उपमुख्यमंत्री

कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर राज्यात पुन्हा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

(म्हणे) ‘लिंग आणि योनी यांची पूजा करून देशाला नष्ट करत आहेत हिंदू !’

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवणे अक्षम्य आहे. पोलिसांनी अशांवर स्वत:हून कठोर कारवाई करायला हवी !

श्रीक्षेत्र सोळशी (सातारा) येथे ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !

कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सोळशी येथे शनीजयंतीनिमित्त शनैश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा केला जातो. या वेळी २८ ते ३० मे या कालावधीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता १२ वीचा निकाल १० जून, तर इयत्ता १० वीचा २५ जूनपर्यंत !

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी रितसर झाल्या. इयत्ता १२ वीचा निकाल १० जून या दिवशी, तर इयत्ता १० वीचा निकाल २५ जूनपर्यंत लागेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

स्वातंत्र्यानंतर अनुमाने ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु स्वा. सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही,…

जेजुरी येथील श्री मार्तंड मंदिराकडून ‘इफ्तार पार्टी’ आयोजित केल्याप्रकरणी दिलगिरी !

मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या माध्यमातून १ मे या दिवशी मुसलमान धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आणि तशी ‘पोस्ट’ही देवस्थानने सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती.

हिंदुराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या जिल्ह्याचे नाव ‘अहमदनगर’ पालटून ‘अहिल्यानगर’ करा ! – गोपिचंद पडळकर, आमदार, भाजप

देशातील सर्वच ठिकाणांना दिलेली मोगल आक्रमकांची नावे तात्काळ पालटणे आवश्यक !

मुंबई महापालिकेकडून बंदी घातलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून ५ कोटी रुपयांचा दंड वसूल !

प्लास्टिकचा वापर करून पिशव्या आणि अन्य उत्पादने सिद्ध करणारे उत्पादक, व्यावसायिक, ग्राहक यांनी पहिल्यांदा आदेशाचे उल्लंघन केले, तर . . . अशी कारवाई करण्यात येणार आहे.