वारगाव येथे गांजाविक्री करणारा कह्यात

सिंधुदुर्ग जिल्हा आता अवैध मद्यासह अमली पदार्थांचेही ठिकाण बनत आहे, असे म्हटल्यास चुकीचे होईल का ?

(म्हणे) ‘सोनिया गांधी आणि मायावती यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा ! – काँग्रेस नेते हरिश रावत

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ऊस उत्पादकांचे आंदोलन मागे

ऊस उत्पादकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिल्याने उस उत्पादकांनी त्यांचे चालू असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी पीएफ्आयने पैसे गोळा केले ! – ईडीचा आरोप

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात अनेक पुरावे सापडूनही केंद्र सरकार अद्याप तिच्यावर बंदी घालत नाही, हे आश्‍चर्यच म्हणावे लागेल, असाच विचार हिंदूंच्या मनात येत असणार !

नेवरा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचा २१ वा नूतनमूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन !

नेवरा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचा नूतनमूर्ती प्रतिष्ठापनेचा २१ वा वर्धापनदिन ७, ८ आणि ९ जानेवारी २०२१, असा ३ दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत.

बर्ड फ्ल्यू’संबंधी सुरक्षिततेचे उपाय करण्याची चेतावणी

हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि केरळ येथे मोठ्या प्रमाणात पशू मरत असल्याने केंद्राने गोव्यासह अनेक राज्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ पसरू नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय करण्याची चेतावणी दिली आहे.

नेहरूंची अक्षम्य चूक जाणा  !

नेपाळचे राजा त्रिभूवन बीर ब्रिकम शहा यांनी नेपाळला भारताचा भाग बनवण्याचा प्रस्ताव सूचवला होता; परंतु नेहरूंनी त्याला नकार दिला, असा दावा माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेंशियल ईअर्स’ या पुस्तकात केला आहे.

शिक्षिकेला अश्‍लील छायाचित्र पाठवणार्‍या धर्मांधाला सांगली येथून अटक

गोव्यातील एका शिक्षिकेला अश्‍लील ‘व्हिडिओकॉल’ करणारा आणि अश्‍लील छायाचित्र पाठवणारा मिरज, सांगली येथील इब्राहिम अहमद खाटीक याला गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने कह्यात घेतले आहे.

गोव्यात गांजाच्या लागवडीवर वर्ष २०२० मध्ये सर्वाधिक कारवाई

राज्यात अनधिकृतपणे करण्यात येत असलेल्या गांजाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोवा पोलिसांनी इतर वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अनधिकृत गांजा लागवडीवर केलेल्या कारवाईवरून ही गोष्ट उघड झाली आहे.