भारतातून हज यात्रेला जाणार्‍यांची ओळखही हिंदू म्हणून होते ! – योगी आदित्यनाथ

संपूर्ण जगाने भगवान श्रीरामाला स्वीकारले आहे; मात्र काही जण त्याचा अद्यापही द्वेष करतात. रामायणाच्या वेळी राक्षस असे करत होते.

मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याने ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत ! – खासदार संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. त्याला संजय राऊत यांनी वरील शब्दांत प्रत्युत्तर दिले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.२.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी कारवाई न झाल्यास सभागृह चालू देणार नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, अन्यथा आम्ही या सूत्रावर तोंड न उघडणार्‍या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, तसेच सभागृह चालू देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पुणे ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्‍या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.

मशिदीमध्ये अजान देण्यास अनुमती नाकारणार्‍या इमामाचा सहकार्‍याकडून शिरच्छेद !

स्वतःच्या धर्मबांधवाचा शिरच्छेद करणारे धर्मांध हे हिंदूंविषयी कधीतरी सहनशीलता दाखवतील का ?

रूपी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर ! – सुधीर पंडित, रूपी बँक प्रशासक

रूपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी सहकार विभागाच्या वतीने विलिनीकरणाचा संयुक्त फेर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे २४ नोव्हेंबर २०२० या दिवशी दिला आहे.

वीजदेयक वसुलीसाठी कृषी पंपांची वीज तोडली

पारनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी गाठले वीज आस्थापनाचे कार्यालय

मराठी भाषेसाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता ! – राज ठाकरे

मराठी भाषेसाठी प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नसून प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून ग्रामस्थांना नोटीस

५० फूट उंच असलेला हा पुतळा राष्ट्रीय महामार्गावरून स्पष्ट दिसतो. तेथे ‘सेल्फी पॉईंट’ही निर्माण करण्यात आला आहे. सातारा शहराच्या वैभवात भर घालणारा हा पुतळा महामार्ग अतिक्रमण पथकाने २६ फेब्रुवारी या दिवशी काढण्यासाठी प्रयत्न चालू केले.