
मुंबई – मराठी भाषेसाठी प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नसून प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले…
१. मराठी बांधवांनी मराठीतून स्वाक्षरी करावी. मी सगळीकडे मराठीतच स्वाक्षरी करतो. प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नाही. आपण अशा कृतीतून भूमिका घ्यायला हवी.
२. सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथे धुडगूस घालू शकतात; पण शिवजयंती, मराठी भाषा दिन या कार्यक्रमांना अनुमती दिली जात नाही. कोरोनाचे संकट पुन्हा येत आहे, तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला.
३. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सरकारच्या मनात आहे कि नाही ? याविषयी माहिती नाही. मराठी भाषा गौरव दिन आल्यानंतर सरकारला जाग का येते ?
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
मराठी भाषेला गोव्याची राजभाषा का करायची ?
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोकणी संघटनांच्या मराठीविरोधी ठरावाचा मराठी राजभाषा निर्धार समितीकडून निषेध
१० अब्ज शब्दांचा मराठी शब्दकोश सिद्ध करणार !
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील अशुद्ध भाषेतील फलक प्रशासनाने हटवला !