
पुणे – रूपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी सहकार विभागाच्या वतीने विलिनीकरणाचा संयुक्त फेर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे २४ नोव्हेंबर २०२० या दिवशी दिला आहे. तांत्रिक किंवा आर्थिक कारणाने रिझर्व्ह बँक निर्णय घेऊ शकत नसल्यास रूपी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यासाठी ठेवीदारांचे सहकार्य आवश्यक आहे, असे रूपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी सांगितले.
रूपी बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत होती. त्याला रिझर्व्ह बँकेने ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बँकेकडून कर्जवसुलीसाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच आणणे, कर्जदारावर, जामिनदारांवर फौजदारी गुन्हे नोंद करणे, मालमत्तांचा लिलाव करणे, कर्जबुडव्याची नावे जाहीर करणे या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या ४ वर्षात २५८ कोटी ११ लाख रुपयांची कर्ज वसुली केल्याची माहिती पंडित यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेने पुनरुज्जीवन प्रस्तावास तत्वत: मान्यता दिल्यास ठेवीदारांना विश्वासात घेऊन पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला पाठवता येईल, असा खुलासा रूपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी केला.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !