मये येथील ग्रामस्थांना सनद देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डिचोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाच्या साहाय्याने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

प्रत्येक गोष्ट पैशाच्या भाषेत मोजणारे सर्वोच्च न्यायालय !

घरी काम करणार्‍या गृहिणींचे कामही त्यांच्या नोकरी करणार्‍या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांनाही वेतन मिळायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.

हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘वर्ष २०११ पासून पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशी नागरिक भारतात अवैधरित्या रहात आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाकडून महाराष्ट्राच्या गृहविभागाला कळवण्यात आली आहे.

पाक आणि चीन यांचे एकत्र येणे भारतासाठी धोकादायक असले, तरी दोन्ही आघाड्यांवर आम्ही सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.

कांदळवन अवैधरित्या तोडणार्‍यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’ मध्ये १२ चित्रपट प्रदर्शित होणार

या चित्रपटांमध्ये ‘नाईट ऑफ द किंग्स्’, ‘लव्ह अफेअर्स’ आणि ‘द बिग हिट’ हे फ्रान्समधील चित्रपट दाखवण्यात येतील.  जगभरातील चित्रपटांमधून उत्कृष्ट आणि निवडक असे चित्रपट ‘कॅलिडोस्कोप’ या विभागात दाखवण्यात येतात.

मोरेना (मध्यप्रदेश) येथे विषारी दारूमुळे ११ जणांचा मृत्यू

विषारी दारू विकली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

विवाहासारख्या सांसारिक बंधनांचा त्याग करून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याची शिकवण देणे धर्मसंमत !

आता काळाच्या दृष्टीने विचार करता भीषण आपत्काळ समोर उभा ठाकला आहे. भयाण अशा आपत्काळाला तोंड देतांना आपल्याच जीविताची शाश्‍वती नसल्याने विवाह करून नवीन दायित्व स्वीकारणे, हे अयोग्य ठरू शकते.

कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नासनोडकरीण देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध

‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने खलिस्तान्यांवर कारवाई करावी !

शेतकरी आंदोलनाविषयी सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने सांगितले की, या आंदोलनामध्ये खलिस्तान्यांनी घुसखोरी केली आहे. याविषयीचा गुप्तचर विभागाचा अहवाल सादर करू.