हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘वर्ष २०११ पासून पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशी नागरिक भारतात अवैधरित्या रहात आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाकडून महाराष्ट्राच्या गृहविभागाला कळवण्यात आली आहे. यांतील महाराष्ट्रात अवैधरित्या रहाणार्‍या विदेशींचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ जानेवारी या दिवशी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.’