कोरोनामुळे ५० हून अधिक देशांत ‘दळणवळण बंदी’ !

कोरोनामुळे ५० हून अधिक देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली असून अनुमाने १ अब्ज नागरिक घरातच आहेत. युरोपातील ३४ देशांमध्ये ‘दळणवळण बंदी’ आहे. कोलंबिया २४ मार्चपासून, तर न्यूझीलंड २५ मार्चपासून पूर्ण बंद होणार आहे.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ती बसमधून कामावरून शाडोंग प्रांतामधून परत येत असतांना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे

स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह अनेक घरांमध्ये पडून !

स्पेनमध्ये कोरोनामुळे २ सहस्र ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० सहस्रांहून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. अनेक घरांमध्ये मृतदेह पडून असून  ते हटवण्यासाठी सैन्याचे साहाय्य घेतले जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गंभीर आजारी असलेल्या वयोवृद्धांना बेवारस सोडण्यात आले आहे.

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी २ सहस्र लोकांना मेजवानी देणार्‍या इरफान सिद्दकी या काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद

येथील अंबिकापूरमध्ये २२ मार्च या दिवशीच्या ‘जनता कर्फ्यू’च्या वेळी २ सहस्र लोकांना पंचतारांकित ‘ग्रँड बसंत’ या हॉटेलमध्ये मेजवानी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नेते इरफान सिद्दकी आणि हॉटेलचे संचालक के.के. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनदात्यांना विनम्र आवाहन !

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्वत्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन २३ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी आवृत्तींची छपाई होऊ शकणार नाही.

गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले.

कोरोना आणि बहुराष्ट्रीय आस्थापनांची ‘नफेखोरी’ची वृत्ती

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

‘जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला ‘प्रतिपदा’ म्हटले आहे. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्‍वरप्राप्तीसाठी घालवण्यासाठी अन् समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले.