गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनाने त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येते. या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.
गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !
नूतन लेख
- अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !
- हिंदु नववर्षानिमित्त चिंचवड (पुणे) येथे भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न !
- पुणे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित शोभायात्रा उत्साहात पार पडली !
- हिवरे गावामध्ये (पुणे) या वर्षी झेंड्याच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली !
- पुणे येथे घरोघरी गुढ्या उभारून शोभायात्रेद्वारे नववर्षाचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत !
- डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन !