
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले. २३ मार्च या दिवशी समितीच्या पदाधिकार्यांनी अनुमाने ३५० भाजी-पोळीची पाकिटे आणि पाणी शहरातील बेघरांना वाटले. ३१ मार्चपर्यंत दिवसातून २ वेळा समितीच्या वतीने वाटप करण्यात येईल, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !