पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले. २३ मार्च या दिवशी समितीच्या पदाधिकार्यांनी अनुमाने ३५० भाजी-पोळीची पाकिटे आणि पाणी शहरातील बेघरांना वाटले. ३१ मार्चपर्यंत दिवसातून २ वेळा समितीच्या वतीने वाटप करण्यात येईल, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप
नूतन लेख
यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण (सिंधुदुर्ग) किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी
पुणे विद्यापिठामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनास विद्यापिठाचा विरोध !
विधानसभेत २१ वर्षांत विविध मंत्र्यांनी दिलेली २ सहस्र ६३६ आश्वासने प्रलंबित !
कोकणातील गणेशोत्सवासाठी ९१७ बस पाठवल्याने मराठवाड्यातील प्रवाशांचे हाल !
सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्या भक्ताची पोलिसांकडून अडवणूक !
कुंकळ्ळी (गोवा) येथील विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या बडतर्फीची शिफारस