तेलंगाणातील प्रत्येक मशिदीत खोदकाम करून सत्य बाहेर काढू ! – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार पुढे म्हणाले की, देशात बाँबस्फोट होतात; कारण मदरसे आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रे बनली आहेत.

गौहत्ती (आसाम) येथे अज्ञातांकडून दोन मंदिरांतील मूर्तींची तोडफोड : शिवलिंग नाल्याजवळ फेकले !

हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने अशा प्रकारची आक्रमणे करणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना संपत्तीतून वगळण्याचा हरिद्वार न्यायालयाचा निर्णय  

मुलांवर योग्य संस्कार न केल्याने अशी मुले पुढे आई-वडिलांचाच छळ करतात. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून धर्माचरण करण्यास शिकवल्यावर ते आई-वडिलांचा श्रावणबाळाप्रमाणे वागून सांभाळ करतील !

जोधपूर येथे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चबाहेर ५ जूनला हनुमान चालिसाचे पठण

राज्यातील सर्व आमदारांना राज्याच्या विधानसभेत धर्मांतराचे सूत्र उपस्थित करण्यासाठी विहिंपकडून पत्र देण्यात येणार आहे. अन्य राज्यांप्रमाणे राजस्थानमध्येही धर्मांतराविरोधात कायदा करण्याची मागणी या संघटनांनी केली.

तामिळनाडू पोलिसांकडून ५०० वर्षे प्राचीन मूर्ती हस्तगत

काहीजण एक प्राचीन मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीवरील भोंगे बंद करा ! – दिवाणी न्यायालयात याचिका

ही मशीद केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणार्‍या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.

सतना (मध्यप्रदेश) येथे नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

सतना शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

कुपवाड येथील जुमागुंड गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. हे तिघेही आतंकवादी लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते. यापूर्वी २५ मे या दिवशी जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.

ताजमहलमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा पर्यटकांना अटक

आगरा येथील ताजमहाल परिसरात २५ मे या दिवशी नमाजपठण करण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ पर्यटकांना पोलिसांनी अटक केली. यांतील ३ भाग्यनगरचे, तर १ आझमगडचा आहे.

आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्यावरून प्रशासनाकडून ओडिशातील चर्च बंद  

देशातील प्रत्येक चर्चमध्ये असे काही घडते का ? याचा शोध घेऊन दोषी चर्चवर अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी हिंदूंनी मागणी केली, तर त्याच चुकीचे ते काय ?