३१ डिसेंबर या दिवशी पुण्यात पुन्हा एल्गार परिषद घेण्याचा डाव

वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेचीच पार्श्‍वभूमी कारणीभूत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. गेल्या वेळेचा अनुभव पहाता पोलीस या परिषदेला अनुमती देणार का . . . ?

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

वसई (जिल्हा पालघर) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकणार्‍या नराधमाला अटक

मुंबई उपनगरातील वसई येथे एका वासनांधाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून ती मृत झाली आहे, असे समजून पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी या नराधमाला अटक केले असून त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.

(म्हणे) ‘ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध असल्याने ती प्यायल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही !’ – बसपचे उत्तरप्रदेश प्रमुख भीम राजभर यांचा दावा

योगगुरु रामदेवबाबा यांच्या औषधाला त्यांच्या आस्थापनाने ‘कोरोनावरील औषध’ संबोधल्याने त्यावर बंदी घालणारे प्रशासन आता अशांवर काय कारवाई करणार आहे ?

‘ऑनलाईन’ २० व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे २५ डिसेंबरला उद्घाटन !

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी २५ आणि २६ डिसेंबर या दिवशी २० व्या संमेलनाचे आयोजन केलेले असून या संमेलनाचा उद्घाटन सोहळा २५ डिसेंबर या दिवशी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पहाणी

केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांच्या पथकाने येथे अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची २२ डिसेंबर या दिवशी पहाणी केली. या वेळी त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे झालेल्या हानीक्षेत्राची पहाणी केली.

५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वीज वितरण आस्थापनाचे कनिष्ठ अभियंता अटकेत

विद्युत् जोडणीचे मीटर बसवल्याचे बक्षीस म्हणून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महाराष्ट्र राज्य विद्युत् महावितरण आस्थापनेचे कनिष्ठ अभियंता अमोल बाळासो कणसे आणि सरकारी ठेकेदार हारुण लाटकर यांना अटक केली आहे.

लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा ! – बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांची हातकणंगले पोलीस ठाण्यात मागणी

सहारानगर, रुई येथील लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा, अशी मागणी बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भवड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित करण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रहित करावी लागली असून भाविकांनी ३० जानेवारीपर्यंत गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्‍या श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा !

प्रत्येक धारकरी, शिवप्रेमी डोळ्यांत प्राण आणून धारातीर्थ यात्रेच्या दिनांकाची वाट पहात होता. अखेर २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत धारातीर्थ यात्रा होत असल्याचे घोषित झाल्यामुळे धारकरी मोहिमेच्या पूर्वसिद्धतेला लागले आहेत.