‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. देवतांची विटंबना करणार्‍यांवर वचक बसावा यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.

हुन्नुरगी (कर्नाटक) गावातील बाळू बरगाले यांनी त्यांच्या नातवाचे नामकरण स्मशानभूमीत केले !

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘स्मशानभूमीतील बारशाचा उपक्रम हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकांनी श्रद्धेचे बाजारीकरण केल्यामुळे अंधश्रद्धा वाढली आहे.’’

या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेनाच हवी ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आकांक्षा होती की, शिवसेना संपूर्ण देशात गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी.

येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा

केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत.

सनदशीर मार्गांनी केलेल्या प्रयत्नांना ईश्वरी साहाय्य मिळते ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मप्रेमींची विदर्भस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत …

पिसाळलेल्या श्वानाच्या आक्रमणात युवक आणि युवती यांचा मृत्यू

संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

३७० कलम हटवल्याने जम्मू-काश्मीरमधील पीडित लोकांना घटनात्मक अधिकार मिळाले ! – जस्टीस डिलेड बट डिलिव्हर्डचे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह

३७० कलम हटवल्याने येथील दलित, महिला, गुरखा, पश्‍चिम पाकिस्तानमधील निर्वासित आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील स्थलांतरितांना न्याय मिळाला आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी प्रबोधन करा !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याविषयी प्रबोधन करण्यासह ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

संस्कृतला महत्त्व दिले जात नसल्याने मी संस्कृत भाषेत चित्रपटनिर्मिती केली ! – दिग्दर्शक वीजेश मणी

संस्कृत ही समृद्ध भाषा असूनही तिला महत्त्व दिले जात नाही; म्हणून मला संस्कृत भाषेतील चित्रपटाची निर्मिती करायची होती, असे उद्गार नमो या श्रीकृष्ण आणि सुदामा या कथेवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. वीजेश मणी यांनी काढले.