
सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – सातारा शहरापासून जवळच असणार्या जकातवाडी आणि डबेवाडी या गावातील पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यामुळे गावातील युवक अन् युवती यांचा मृत्यू झाला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या रूपाली माने आणि देवानंद लोंढे यांचा पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. घायाळ झालेल्या रूपाली माने आणि देवानंद लोंढे यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला आहे. जकातवाडी या गावाजवळच सोनगाव ‘कचरा डेपो’ आहे. यामध्ये संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे लक्षात येत नाही का ? – संपादक)
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !