
सातारा, २३ जानेवारी (वार्ता.) – सातारा शहरापासून जवळच असणार्या जकातवाडी आणि डबेवाडी या गावातील पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्यामुळे गावातील युवक अन् युवती यांचा मृत्यू झाला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या रूपाली माने आणि देवानंद लोंढे यांचा पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला. घायाळ झालेल्या रूपाली माने आणि देवानंद लोंढे यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला आहे. जकातवाडी या गावाजवळच सोनगाव ‘कचरा डेपो’ आहे. यामध्ये संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. यामुळे या ठिकाणी श्वानांचा वावर असतो. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून पिसाळलेल्या आणि भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे लक्षात येत नाही का ? – संपादक)
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड