ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांकडून स्थानिक प्रशासनाला निवेदन आणि अन्य उपक्रम

हिंदु समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत होत असल्याचे हे द्योतक आहे !

‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ या वृत्तसंकेतस्थळाच्या वतीनेही ३१ डिसेंबरच्या रात्री रक्तदानाचा उपक्रम

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अपप्रकार रोखण्यासाठी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या वतीने ‘झिंगू नका, पिऊ नका, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रक्तदानाची संधी सोडू नका’, असे आवाहन करण्यात आले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १०४ निवृत्त सनदी अधिकार्‍यांचे ‘लव्ह जिहाद’ कायद्याचा विरोध करणारे पत्र !

लव्ह जिहादला विरोध होऊ लागल्यावर धर्मांधांची तळी उचलणारे राजकीय पक्ष पुढे होतेच, आता निवृत्त सनदी अधिकारीही त्यात सहभागी झाले आहेत.

‘कालोत्सव अणि जत्रोत्सव यांमध्ये चालणारा जुगार बंद करा’, अशी सत्तरी तालुक्यातील नागरिकांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस, प्रशासन आणि संबंधित देवस्थानचे व्यवस्थापन स्वतःहून जत्रोत्सवातील जुगार का बंद करत नाहीत ? जुगारवाल्यांच्या दहशतीपुढे प्रशासन नमते घेते का ?

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर), अंबड (जिल्हा जालना), धारावी आणि मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

३१ डिसेंबर साजरा करून १ दिवसाचे मानसिक धर्मांतर करू नका ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

३१ डिसेंबर साजरा करणे ही हिंदू संस्कृती नाही. मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचणे, ‘रेव्ह पार्ट्या’ करणे, अशा कृती या दिवशी सर्रास केल्या जातात. या रात्री मद्यधुंद झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढते.

३१ डिसेंबरला महाबळेश्‍वर आणि पाचगणीतील सर्व कार्यक्रमांना रात्री १० नंतर प्रतिबंध

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी महाबळेश्‍वर आणि पाचगणी या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांना रात्री १० वाजल्यानंतर चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात तरुणावर आक्रमण करून हत्या होत असतांना जनता निष्क्रीय !

ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होय ! अशा घटनांच्या वेळी जनता पुढे न येण्याचे एक कारण पोलिसांकडून नंतर होणारा त्रास ! पोलीस जनतेचे मित्र नसल्याने जनताही त्यांना साहाय्य करण्यास पुढे येत नाही !

भाजपच्या आमदाराने पूजेच्या ठिकाणी असलेली पूजा सामग्री लाथेने उडवली !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती ! भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्‍चित !

पर्यटकांच्या दायित्त्वशून्य वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.