ग्रामपंचायतीमधील पोलीस शिपायाने वारंवार त्रास दिल्यामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.

आखरी रास्ता कृती समितीच्या निवेदनानंतर गंगावेस ते शिवाजी पूल वाहतूक एकेरी मार्ग चालू

गंगावेस ते शिवाजी पूल या मार्गावरील रस्त्याच्या एका टप्प्याचे काम सध्या पूर्ण झाले असून यातील शुक्रवार गेट ते शिवाजी पूल पाणीवाहिनी आणि भुयारी गटार वाहिनी यांचे काम चालू होत आहे.

इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा चालू करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा आणि आरोग्य विषयक सूत्रे यांचा विचार करून, तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य अन् शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

जातीव्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला सिद्ध आहोत ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे. आर्थिक निकषावरील आरक्षणाला आमचा विरोध आहे. सगळेच आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नसल्याने जातीच्या आधारावर आरक्षण आहे. त्यामुळे जाती व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला सिद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

प्रतिलिटर पेट्रोलचे मूल्य ४० रुपये असले पाहिजे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

९० रुपये मूल्य असणार्‍या प्रतिलिटर पेट्रोलमध्ये त्याचे मूळ मूल्य केवळ ३० रुपये असते; मात्र त्यानंतर विविध कर, पेट्रोल पंपचे कमिशन आणि अन्य खर्च ६० रुपये असतो. त्यामुळे त्याचे मूल्य ९० रुपये होते.

डॉ. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वहाण्यास गेलेले हिंदु मक्कल कत्छीचे अर्जुन संपथ यांच्याशी द्रमुक आणि व्ही.सी.के. यांच्या कार्यकर्त्यांकडून गैरवर्तन

समानतेसाठी लढा देणार्‍या बाबासाहेबांच्या नावाखाली अशा प्रकारचे गैरव्यवहार करणारे राजकीय पक्ष कधीतरी समाजाचा व्यापक विचार करू शकतील का ?

अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅनाबिसच्या लागवडीमध्ये गोव्यात वाढ

चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा, गोवा  सध्याच्या काळात सामाजिक माध्यमांचे महत्त्व लक्षात घेता घरबसल्या समाजात राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करण्याच्या उद्देशाने नुकतेच धर्मप्रेमी महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले. या शिबिराचा अनेक धर्मप्रेमी महिलांनी लाभ घेतला.

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील प्रविष्ट केलेले खटले मागे घेणार ! – शासनाचा निर्णय

राज्यातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या वेळी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने २ डिसेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला.

शिक्षणक्षेत्रात क्रांती हवी !

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.