विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे मतदान
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून या दिवशी झालेल्या निवडणुकीत विधान परिषदेसाठी २८५ आमदारांनी मतदान केले होते. निकाल घोषित होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अयोध्येत येणे ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. मी येथे राजकारण करायला नव्हे, तर दर्शन घ्यायला आलो आहे. अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी; म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे १५ जून या दिवशी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयी मनसेने त्यांच्यावर ‘ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो’, अशी टीका केली आहे.
आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाफटका केला नाही. घोडेबाजारात उभे होते, त्यांची ६-७ मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणता व्यापार केला नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते.
काश्मीर खोर्यात काश्मिरी हिंदू, तसेच अन्य हिंदू यांच्या ‘लक्ष्यित हत्या’ (टार्गेट किलिंग) केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोर्यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबियांची भेट घेतली.
‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणार आहे. संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वचन मी पूर्ण करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी येथे विराट सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार सिद्धता करण्यात आली आहे. या सभेला लक्षावधी लोक येतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.