अज्ञानी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

स्वतःला तथाकथित उद्योजक म्हणवणारे शरद तांदळे यांचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला असून यामध्ये त्यांनी हरिपाठ, पारायण, कीर्तन परंपरा यांची विटंबना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे बुद्धीगम्य ज्ञान शिकवणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे बुद्धीलय शिकवणारे अध्यात्मशास्त्र ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

नजरकैद आणि जामीन यांमागील वस्तूस्थिती !

जानेवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षली आरोपींना नजरकैद दिल्यानंतर गदारोळ झाला होता, तो योग्यच होता. हेच सर्वोच्च न्यायालयाचा आंध्रप्रदेश सरकारविरुद्धच्या खटल्याचा निवाडा आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा निवाडा यांवरून सिद्ध होते. नजरकैद ही फौजदारी निगराणी संहितेतील व्याख्येत कुठेही बसत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्‍वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्‍वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(म्हणे) ‘मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटले !’ – अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’चा अहवाल

अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

(म्हणे) ‘सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी !’ – मुक्ता दाभोलकर

सद्यःस्थितीत पुरोगामी विचारांनी कार्य करणार्‍या संघटना सत्तेपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे पुरागामी विचारांचे सरकार निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे शोषित अन् वंचित यांसाठी कार्य करणार्‍या सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.

(म्हणे) ‘आकाशवाणीवरून सनातनी विचारांचा प्रसार केला जातो !’ – डॉ. बाबा आढाव

‘नासा’सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सनातन ग्रंथांचा आधार घेऊन संशोधन करत असतांना सनातन धर्माच्या ग्रंथांना अवैज्ञानिक म्हणणे हास्यास्पद ! किंबहुना गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, स्थापत्य, पर्यावरण आदी सर्वच शास्त्रांचे मूळ सनातन धर्मात आहे !