सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या नावांची पाटी मराठीत लावणे अनिवार्य !

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तिथे व्यवसाय करतांना तुम्हाला तो मान्य करायला काय हरकत आहे ?-सर्वोच्च न्यायालय

केंद्रशासन शहरातील घरांसाठीच्या गृहकर्जावर अनुदान देणारी योजना आणणार

केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.

कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांकडून बेंगळुरू बंदचे आंदोलन

कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्‍यांनी २६ सप्टेंबर या दिवशी बंद पाळला. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १३ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूला कावेरी नदीतून १५ दिवसांसाठी ५ सहस्र क्युसेक पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.

मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्‍या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड

मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

भारतातील दक्षिण कोरियाच्या दूतावासाने घेतलेल्या नव्या वाहनाची हिंदु पद्धतीने विधीवत् पूजा

सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्‍यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?

गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक ! 

धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्‍लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !

सिंधुदुर्ग किल्ल्यावर २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार

‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही ‘जागतिक पर्यटन वर्ष २०२३’ ची जागतिक संकल्पना (थीम) असून त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे.

हजारीबाग (झारखंड) येथील भाजप आमदार मनीष जयस्वाल यांना निवेदन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

(म्हणे) ‘रामदास संत नव्हे, महाराष्ट्रातील जंत !’ – श्रीमंत कोकाटे

समर्थ रामदासस्वामी यांना जातीयवादी म्हणणारे आणि एकेरी संबोधणारे, हिंदु अन् ब्राह्मण द्वेष्टे श्रीमंत कोकाटे ! अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते, याची सर्वांना कल्पना आहे ! हिंदु निद्रिस्त असल्यामुळेच कोकाटे यांच्यासारख्यांचे फावले आहे !

आपला देश खरोखरच हिंदु राष्ट्र बनत आहे !

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ सरकारने (‘एन्.डी.ए.’ने) ‘इंडिया’ या शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याला प्राधान्य दिले आहे.