अमली पदार्थांसह ३ जण आणि मर्सिडीस गाडी घेतली कह्यात

गुन्हे अन्वेषण विभागाने दोनापावला येथे धाड टाकून मुंबईस्थित स्ट्रोमे कॅनडी आणि व्हेलेंटाईन परेरा, तसेच भाग्यनगरस्थित आयन अली खान यांना ८ लाख ५० सहस्र रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह कह्यात घेतले आहे.

हिदूंसाठी शिवप्रतापदिन म्हणजे दसरा-दिवाळी यांसारखाच सण ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

संपूर्ण विश्‍वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

राज्यातील कारागृहातील अपप्रकार रोखण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार ! – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह)

गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्‍या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ?

अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरातील दर्शन पुन्हा बंद

२५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे आणि स्वामी भक्तांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करावी

देहलीमध्ये मांस विक्रेत्यांना मांस ‘हलाल’ कि ‘झटका’ पद्धतीचे आहे, हे सांगणे बंधनकारक ठरणार !

अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे. हलाल पद्धतीमुळे मुसलमान समाजाची मांस विक्रीमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाल्याने हिंदु खाटीक समाज बेरोजगार होत आहे आणि हिंदूंना वर्ज्य असतांनाही हलाल मांस खावे लागत आहे !

मुसलमानबहुल भागात पोलीस, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी मुसलमानच ठेवावा !

काँग्रेसच्या राज्यात सच्चर आयोगाने अशाच प्रकारची शिफारस केली होती, तीच शिफारस आता अल्पसंख्यांक मंत्रालय करत असेल, तर अद्याप या मंत्रालयात काँग्रेसी मानसिकतेचे अधिकारी आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

उज्जैन येथे नाथ संप्रदायाच्या पंच पीर समाधीला हिरवा रंग देऊन ती बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना साधूंनी हाकलवून लावले !

मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यात येत होते. तर आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे !

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.