राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे.