सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्वस्तिक पीठा’चे पीठाधीश्वर, उज्जैन

सरकार केवळ हिंदूंची मंदिरे नियंत्रणात का घेत आहे ? सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे.

सरकार ‘गोवा देवस्थान नियमन कायद्या’त सुधारणा करणार

महाराष्ट्रात आहे तशी परिस्थिती गोव्यात होऊ नये, यासाठी देवस्थान समित्यांनी मंदिरे शासनाच्या कह्यात जाणार नाहीत, हे पहाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवस्थान समित्यांवर भक्तांची नेमणूक करून घोटाळे होणार नाहीत, असे पहाणे आवश्यक आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

गुजरातमधील शक्तिपीठ असणार्‍या अंबाजीमाता मंदिरातील प्रसाद ‘मोहनथाळ’ बंद केल्याने वाद !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर याहून वेगळे काय होणार ? गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ‘मोहनथाळ’ प्रसाद म्हणून दिली जात असतांना अचानक ती बंद करणे ही मोगलाईच होय ! हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

पंढरपूर मंदिरात सजावटीसाठी वापरलेली १ टन द्राक्षे गायब !  

मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्‍न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात.

श्री महालक्ष्मीदेवीच्या तोंडवळ्यावरील भाव पूर्णपणे पालटले असून मूर्ती धोकादायक स्थितीत !  

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! धर्मशास्त्रविसंगत कृती करून भाविकांना देवीतत्त्वापासून वंचित ठेवले जात असून हे थांबवायचे असेल, तर मंदिर भक्तांच्या कह्यात द्या !

सक्रीय राजकारणात असणारे लोक मंदिरांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत !

खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !

श्री काशी विश्‍वनाथाच्या मंगल आरतीच्या शुल्कात वाढ !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यावरून ‘सरकारी विश्‍वस्तांचा केवळ मंदिराच्या पैशांवरच नाही, तर भाविकांच्या पैशांवरही डोळा असतो’, असे कुणाला वाटल्यास चूूक ते काय ?

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !