अरबी समुद्रातील ‘एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेची घुसखोरी

भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता त्याला जाब विचारायला हवा ! भारताने चीन आणि पाक यांच्यासह आता अमेरिकेलाही धाकात ठेवायला हवे, हे यावरून लक्षात येते ! असा देश भारताचा कधीतरी मित्र राष्ट्र होऊ शकतो का ?

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

आपली आक्रमण करण्याची तीव्रता ही चीनहून अधिक हवी. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर करून ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ केले पाहिजेत. ज्या स्तरावर चीनने भारतावर आक्रमण केले, त्याच स्तरावर भारतानेही उत्तर द्यायला पाहिजे.

(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.

चिनी आस्थापनांना गुंतवणूक करण्याची अनुमती देण्याचा कोणताही विचार नाही ! – केंद्र सरकार

राष्ट्रहितासाठी चिनी आस्थापनांना आता भारतात गुंतवणूक करण्याची अनुमती देऊ नये !

अरुणाचल प्रदेशात चीनचे गाव : किती खरे आणि किती खोटे ?

चीनच्या कोणत्याही कारवाईला प्रत्युतर देण्यासाठी भारत सर्व प्रकारे सिद्ध आहे. तरीही भारताने अधिकाधिक सिद्धता करायला पाहिजे; कारण चीनसमवेतची लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. ही लढण्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहेच; परंतु देशातील अन्य राजकीय पक्षांनीही सशस्त्र सैनिकांच्या मागे ठामपणे उभे रहायला पाहिजे.

‘अ‍ॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात निर्मित होण्याची शक्यता !

भारत सरकारकडून स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल, असे घोषित करण्यात आल्याने ‘अ‍ॅपल’ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे.

फ्रान्सहित सर्वोपरि ।

जगाची पर्वा न करता स्वदेशहित जोपासणार्‍या फ्रान्सच्या प्रशंसनीय भूमिकेतून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. फ्रान्सच्या तुलनेत जिहादी आतंकवादाने कैकपटींनी होरपळलेल्या भारताने यातून बोध घेणे आवश्यक आहे.

चीनकडून एका बाजूला चर्चा आणि दुसर्‍या बाजूला मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धसाहित्य तैनात !

चीन विश्‍वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

चीनचा अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याधिकारी तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करणार !

चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.