लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड केल्याचे प्रकरण !

बेंगळुरू – लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी तोडफोड आणि तिरंगा उतरवल्याच्या प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सुरक्षेतील त्रुटींसाठी ब्रिटिश सरकारला उत्तरदायी धरले. ते म्हणाले, ‘‘ब्रिटन सरकार सुरक्षेचे दायित्व पार पाडण्यास पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. ज्या देशात दूतावास किंवा उच्चायुक्तालय आहे, तिथे काम करणार्या मुत्सद्दींना सुरक्षा पुरवण्याचे दायित्व त्या देशाचे असते. उच्चायुक्तालयाच्या भोवतालच्या आवाराच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे; पण ब्रिटिश सरकार तसे करण्यात अपयशी ठरले आहे.’’ बेंगळुरू येथे युवा संवादाला संबोधित करतांना परराष्ट्रमंत्र्यांनी हे विधान केले.
#WATCH दूतावास या उच्चायोग के परिसर का सम्मान सुनिश्चित करने के लिए राजनयिक को सुरक्षा देना प्राप्तकर्ता देश का दायित्व है। इन दायित्वों को पूरा नहीं किया गया। इस पर हमारी ब्रिटिश सरकार से बातचीत हुई है: ब्रिटेन में भारतीय उच्चायोग में तोड़फोड़ पर विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर pic.twitter.com/X3OtlD4R22
— ANI_HindiNews (@AHindinews) March 24, 2023
ते पुढे म्हणाले की, ज्या दिवशी खलिस्तानवादी उच्चायुक्तालयासमोर आले, त्या वेळी उच्चायुक्तालयाला पुरवण्यात आलेली सुरक्षा अपेक्षित दर्जाची नव्हती. अनेक देश उच्चायुक्तालयांना सुरक्षा पुरवण्यात निष्काळजीपणा दाखवतात. ते स्वतःच्या सुरक्षेविषयी सतर्क असतात; मात्र इतरांच्या सुरक्षेविषयी त्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो. सुरक्षेविषयी अशा प्रकारचा दुजाभाव आम्ही स्वीकारणार नाही.
संपादकीय भूमिकाभारताने ब्रिटनला या प्रकरणात सुनावण्यासह त्याला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक ! |
Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
France Backs India : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे ! – फ्रान्स
Trump Vs Lula : ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नका !
US-Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्यात अंततः युद्धबंदी करार !
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
US Iran Peace Deal : अमेरिका-इराण यांच्या युद्धबंदी कराराचे मध्यस्थ म्हणून पाकने लाटले श्रेय !