बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या निविदेच्या अटी आणि शर्ती २ सप्ताहांमध्ये निश्चित करू ! – महापालिका प्रशासन

या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. विविध मार्गांनी आंदोलन करत हा प्रकल्प रहित करण्याची मागणीही केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ‘विर्डी’ धरणाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सोलापूर येथे अनुमतीविना झाडे तोडल्याने अधिकार्‍याला ५ लाख रुपये दंड !

शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची अनुमती न घेता तोडल्याविषयी पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रत्येकी १ वृक्ष १ लाख रुपये यानुसार ५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

गोव्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता

हवामान खात्याने १४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या वेळी प्रतिघंटा ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाट चालू असतांना मोकळ्या जागेत राहू नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय संस्‍कृती मानवाला निसर्गाचा योग्‍य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी असणे

ज्‍या राष्‍ट्रात पर्यावरणाच्‍या शुद्धीसाठी नियमित गायीच्‍या तुपाची आहुती देऊन (गोघृत) यज्ञ-यागामध्‍ये हवन केले जात असे, तेथे आज गोहत्‍येसाठी पशूवधगृहे उघडण्‍याची अनुमती स्‍वतः सरकारच देत असेल, तर तेथे प्रदूषण होणे, ही आश्‍चर्याची गोष्‍ट नाही !

गोवा : उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा १२ वाजता सुटल्या !

राज्यात उष्णतेच्या लाटेची नोंद घेऊन शिक्षण खात्याने ९ आणि १० मार्च या दिवशी शाळा १२ वाजेपर्यंत सोडाव्यात, असा आदेश काढला आणि ९ मार्च या दिवशी बहुतांश शाळा १२ वाजता सोडण्यात आल्या.

पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करा ! – पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल

ज्ञानप्रसारक मंडळाच्या संशोधन केंद्राने, गोवा सरकारचे पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांनी आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग सिद्ध करून तो बाजारात उपलब्ध केला आहे.

‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्‍यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !

‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्‍यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्‍या विपरित परिणामांविषयी गप्प का ?

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्यासमवेत पर्यावरणपूरक कामांचा संकल्प करावा, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल- उदय सामंत

प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी वापरणार असल्याचा कर्नाटकचा दावा खोटा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

कर्नाटक वारंवार धरणाचे बांधकाम पिण्याच्या पाण्यासाठी करत असल्याचा दावा करत असले, तरी कर्नाटकने पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल यासंबंधी कोणतीही कृती केलेली नाही.