अन्यथा आम्हीच कृषी कायद्यांच्या कार्यवाहीला स्थगिती देऊ !

ही परिस्थिती कशी सांभाळणार आहात ? चर्चेतून हा तोडगा काढणार का ?, इतकाच आमचा प्रश्‍न आहे. ‘हा वाद सुटेपर्यंत कायदे लागू करणार नाही’, असे सरकार म्हणू शकले असते. सरकार समस्येचे समाधान आहे कि भाग ?, हे आम्हाला कळत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले.

‘सीरम’च्या लसीच्या वापराला अनुमती

‘सीरम इन्स्टिट्युट’च्या ‘कोविशिल्ड’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. याविषयीच्या तज्ञांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे लसीकरणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या लसीमध्ये गायीचे रक्त वापरण्यात आल्याने त्याला अनुमती नाकारावी !

जर मुसलमान आणि हिंदु या लसीद्वारे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवत आहेत, तर सरकारने या लसीमध्ये कोणत्या घटकांचा वापर करण्यात आला आहे, हे अधिकृतपणे घोषित करावे, असेच जनतेला वाटते ! – स्वामी चक्रपाणी, हिंदू महासभा

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून देहलीत चालू झाली चालकविरहित मेट्रो !

देहलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित म्हणजे चालकविरहित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो ३७ किमीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोला संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम आहे. मेट्रोच्या ‘मॅजेन्टा लाइन’ आणि ‘पिंक लाइन’ यांवर ही मेट्रो चालवली जाणार आहे.

अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड

देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.

बांगलादेशात फाशी ठोठावलेल्या गुन्हेगाराला १० वर्षांनंतर देहलीत अटक !

बांगलादेशातील गुन्हेगार हे घुसखोरी करून भारतात येऊन लपून रहातात; मात्र भारतीय सुरक्षायंत्रणा आणि पोलीस झोपलेले असल्याने त्यांचे फावते, हेच यातून लक्षात येते ! घुसखोरांसह अशांवरही कारवाई आवश्यक !  

४९ दिवसांत गुन्हा न नोंदवल्याने देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण : न्यायालयाने अशा पोलिसांना केवळ फटकारण्यासह कठोर शिक्षाही सुनवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

जिहादी आतंकवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्या अभद्र आघाडीचे नवी देहली प्रयोगकेंद्र ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, नवी देहली

देशाला हिंदुस्थान म्हटले जाऊ शकते, तर हिंदु राष्ट्र का नाही ? प्रत्येक वेळी अल्पसंख्यांकांनीच का ठरवायचे की, देशाने कोणत्या दिशेला जायला हवे ? हिंदूंनी आपल्यासाठी विचार करू नये का ?

संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !